Tuesday, 10 March 2015

संवाद

कधी कधी अस का होत की कालपर्यंत जे आवडत होत किव्वा उद्याही जे आवडणार आहे ते आज अचानक आवडेनास होत? कितीही प्रयत्न केला तरी त्या गोष्टींत लक्ष लागेनास होत…
मग आज नक्की काय बदलल आहे? त्या गोष्टीतली आवड का मनाशी त्या गोष्टीविषयी चालू असलेला संवाद? 

संवादाला दरवेळी शब्दांची गरज नसते…काही संवाद शब्दांपलीकडचे आणि स्पर्शातून व्यक्त होणारे असावेत…

संवाद परत दोन प्रकारचे…मनाचे जगाशी चालणारे आणि मनाचे मनाशीच चालणारे…
जगाशी चालणार्या संवादात जास्त नियम नसतात, जास्त अवघडपणा नसतो…जे वाटत ते बोलायचं; जे पटत ते करायचं…इथे माणसांना मनवता येत, समजवता येत, प्रसंगी रागावता पण येत आणि रागावून परत जवळ करता येत…
मनाचा मनाशी चालणार्या संवादात मात्र अनेक चढ-उतार असतात….कारण येथे एक मन सदैव दुसर्यावर हुकुम गाजवायला बघत असत…इथे मनवण, रागावण आणि जवळ करण तितकस सोप्प नाही कारण इथे अर्जुन पण तेच आणि सारथी कृष्ण पण तेच… 

मन कोडी घालत असत..मन कोडी सोडवत असत…खरतर आपल्याच दोन मनातील फरक हे आपल जगण असत…
मन प्रश्न विचारत असत…त्याची उत्तरेपण स्वत:च शोधत असत…आणि त्या मिळालेल्या उत्तरातून पुन्हा नवीन प्रश्न शोधत असत… 

मनाच्या server शी चालणारा हा संवाद नेहमी जिवित ठेवला पाहिजे. कारण ह्या संवादाचा down time खूप त्रासदायक असतो; ह्या server शी कोणतीही back-up लिंक नसते…  

-- अमोल नेरलेकर 

सहवास

कधी कधी अस होत की सामोरासमोर भेटल्यावर किव्वा ठरवून भेटल्यावरही बोलायला काही विषय सुचत नाहीत. पण म्हणून समोरच्याशी बोलायचं नाही किव्वा बोलायला काही विषयच नाहीत असा काही त्याचा अर्थ होत नाही.

माणूस माणसाशी मनाने जोडला असतो आणि दोन मनांच्या संवादाला दरवेळी शब्दांचीच गरज भासते असे नाही. काही गोष्टी शब्दान्पल्याड असतात; त्यांनाच आपण भावना म्हणतो; आणि ह्या सार्यांपलीकडे असतो तो सहवास…

संवादाच्या प्रत्येक माध्यमाचे स्वत:चे असे अढळ स्थान आहे, स्वत:चे असे महत्व आहे. शब्द बोलायला लागतात, भावना समजायला लागतात आणि सहवास अनुभवायाला लागतो…

पाउस पडतो आहे, किंबहुना पाउस कसा आहे हे शब्दांतून सांगता येत, कधीकधी कवितेतून वर्णितादेखील येत…
पण पावसाला आपलस करण्यासाठी, त्याला जवळ करण्यासाठी मनात भावना असावी लागते,
आणि पाउस काय आहे हे कळण्यासाठी त्याच्या सहवासात भिजाव लागत…

सहवास क्षणिक असतो…सहवास क्षणांचा असतो…
सहवासाला वेळेची मर्यादा नसते…सहवासाची व्याख्या नसते…
सहवास भेद-भाव पाळत नाही…सहवास कधीही जाळत नाही…

माणसाचं अबोल अस्तित्वदेखील लाखमोलाचे असते. कारण माणसाचा सहवास ही समजावून सांगायची गोष्ट नव्हे…
सहवास ही अनुभवायाची गोष्ट आहे…

- अमोल नेरलेकर